Click Me Join Us Join Learn More Click Here Download Now Contact Us

Chhota Rajan   चा गणपती म्हणून देखाव्यासोबतच मुंबईतल्या Sahyadri Krida मंडळाची आजही चर्चा होते

 मुंबईतल्या गणपतींच्या पायावर डोकं ठेवण्यासाठी झालेली गर्दी. व्हीआयपी दर्शनाची सुविधा पुण्यात मंडळांनी उभारलेले देखावे आणि ते बघण्यासाठी जमलेली अफाट गर्दी याची चर्चा तुम्ही ऐकली असेल . ही गर्दी बातम्यांमध्ये पाहिली असेल किंवा या गर्दीचा भागही झाला असाल. पण याच बातम्यांमध्ये आणि चर्चांमध्ये आणखी एक मंडळ होतं Chhota Rajan  च .या मंडळाच्या देखाव्याची चर्चा झाली. या मंडळाला सेलिब्रिटींनी भेटी दिल्या आणि या मंडळासाठी या गोष्टी नव्या नव्हत्या अगदी 80-90 च्या दशकापासूनच्या परंपरा आणि देखाव्यांमुळे ओळखलं जाणं हा या मंडळाचा इतिहास.

हेही वाचा :  मध्ये रात्री   Pune, Satara, Baramati फिरणाऱ्या Drone चं रहस्य नेमकं काय ? 

Chhota Rajan  : टिळक नगरच्या सह्याद्री  क्रीडा मंडळाची चर्चा 

Chhota Rajan


टिळक नगरच्या सह्याद्री  क्रीडा मंडळाची चर्चा जशी देखाव्यांमुळे होते . तशीच  एका नावामुळेही ते नाव म्हणजे Chhota Rajan . मुंबईच्या अंडरवर्ल्ड मधले गुंड जितके घातकी होते तितकेच भाविक आणि धार्मिक सुद्धा . सगळी दुनिया आपली शत्रू आहे आणि आपल्याला तारणारा फक्त देवच आहे हे कित्येक डॉन लोकांच्या डोक्यात फिड बसलं होतं .so

मुंबई अंडरवर्ल्डचे अभ्यासक एस हुसेन जैदी यांनी आपल्या भाखडा ते बँकॉक या पुस्तकात डॉन लोकांच्या उत्सवप्रियतेबद्दल बरच लिहून ठेवलंय . डॉन लोकांमध्ये देवाधर्माच्या कारणावरून अनेकदा स्पर्धा लागायची . आघाडीवर होता वर्धा राजन मुदलियार उर्फ वर्धाबाई वर्धान.

माटुंगा स्टेशन जवळ मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा करायला सुरुवात केली . त्याच्या मंडळाचं लाईटिंगचं डेकोरेशन बघायला गर्दी व्हायची . तशीच पण सोबतच मोठमोठे नेते सेलिब्रिटी च्या गणपतीला हजरी लावायचे . 1982 मध्ये अमिताभ आजारी असताना जया बच्चनही या गणपतीला प्रार्थना करण्यासाठी जायच्या गणपती बद्दल  फेमस किस्से आहेत .so

सुरुवातीला गणपतीचा मंडप अगदी छोटा होता पण जस जसा वर्धा राजन मोठा झाला तस तसा मंडपाचा आकार वाढत गेला. पण जेव्हा पोलीस आयुक्त वाय सी पवार यांनी   वर्धाभोवतीचा जाळ आवळलं तेव्हा मंडपाची साईज 100 फूट करण्यात आली . वर्धाचा धबधबा कमी होत चाललाय याची ती खून होती.so

नंतर तर वर्धान मुंबई सोडली आणि चेन्नईत त्याचा मृत्यू झाला. अरुण गवळीच्या दगडी चाळीत आजही मोठ्या जल्लोषात नवरात्रोत्सव साजरा होतो .  जेव्हा अंडरवर्ल्डचं वातावरण गरम होतं तेव्हा पोलिसांनी हस्तक्षेप करत त्याला मंडपाचा आकार कमी करायला लावला . रात्री 10 नंतर गाणे लावायची नाहीत अशी ताकीद दिली मुंबईत .आणखी एक डॉन होता जो गणेशोत्सव उत्साहात साजरा करायचा तो म्हणजे राजन अण्णा नायर उर्फ बडा राजन .

टिळक नगर मध्ये होणाऱ्या  बडा राजांच्या गणेशोत्सवाला गर्दी ही मोठ्या प्रमाणात व्हायची. बडा राजांच्या मृत्यूचा बदला घेऊन त्याच्या टोळीचा राजा बनला Chhota Rajan  .  1987 मध्ये राजन आणि दाऊदची हात मिळवणी झाली . तेव्हा राजन सगळ्यात आधी या टिळक नगरच्या गणपतीची पूजा केली .so

Chhota Rajan : मुंबईत कोणीच करत नसेल असा देखावा साकारायला सुरुवात झाली

छोट्या राजन  मंडळाची सूत्र हातात घेतली. आणि सगळ्या मुंबईत कोणीच करत नसेल असा देखावा साकारायला सुरुवात झाली . टिळक नगरच्या सह्याद्री क्रीडा मंडळानं भारतातल्या वेगवेगळ्या वेगळ्या मंदिरांचे सेट्स उभारले. कोलकात्याच दक्षिणेश्वर काली मंदिर ,राजस्थानचं रांकापूर, जैन मंदिर, हम्पीच विठ्ठल मंदिर ,अजिंठा वेरूळ ,शनिवारवाडा ,मैसूर पॅलेस अशा कित्येक वास्तू टिळक नगरात उभ्या राहिल्या.so

या डेकोरेशनला 50 ते 60 लाख रुपये खर्च यायचा असं सांगितलं जातं . देखावा परफेक्ट असावा याची जबाबदारी बॉलिवूडच्या मोठमोठ्या सेट डिझायनर्स कडे दिली जायची. मंडळाचे कार्यकर्ते आणि डेकोरेशन बनवणारे यांची स्टडी टूर सुद्धा काढली जायची. पुढं जाऊन हे देखावे मंदिरांच्या पलीकडे जाऊन चित्रनगरी, कुंफू पांडा गार्डन , डिजनी लँड असे झाले.so

लालबागच्या राजाला आता गर्दी असते पण त्याआधी अशी गर्दी जमवणं सह्याद्री क्रीडा मंडळाला जमलं होतं.असं चेंबूर मधली लोक सांगतात.  दरवर्षी गणपती मंडळाबद्दल दोन गोष्टी वाढत चालल्या होत्या. म्हणजे खर्च आणि दुसरं म्हणजे मणपाचा आकार. पुढे Chhota Rajan   दुबईला गेला .तरी त्यानं गणेशोत्सवात काहीच कमी पडणार नाही याची काळजी घेतली असं सांगितलं जातं .

टिळकनगर च्या गणपतीची महाराष्ट्रभर चर्चा होणं कायम होतं राजन इथन नसला तरी खर्च लाखोंमध्येच व्हायचा. बॉलिवूडच्या सेलिब्रिटीपासून बड्या राजकीय नेत्यांपर्यंत सगळेजण गणपतीला हजेरी लावत होते . आजही लावतात मागच्या वर्षी मंडळाने उभारलेल्या राधाकृष्ण मंदिर आणि  वृंदावन गार्डनची चर्चा झाली होती.so

तशीच यंदा उभारलेल्या संकटमोचन हनुमान मंदिराची होती. आजही मंडळानं आपली शान जपली असली तरी एस हुसेन जैदी लिहितात टिळक नगरच्या रहिवाशांकडून मिळालेल्या वर्गणीवर देखावे उभारले जातात .असं कार्यकर्ते भासवायचे पण Chhota Rajan   आपल्या गणेशोत्सवात कसलीही कमी पडू देत नसायचा.

1990 च्या सुमाराला टिळक नगरच्या मंडपाच्या भिंतीवर छोटा राजांची अद्याक्षर मिरवली जायची इतकी क्रेज राजांची होती . पुढं पोलिसांनी गुंडांना गुंडाळण्याची मोहीम आखली आणि ही पद्धत बंद करण्यात आली. 2003 साली मंडपाचा आकार नियमापेक्षा मोठा असल्यानं पोलिसांनी
 त्याचा काही भाग कमी करायला लावला होता .तेव्हा एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं होतं की मंडपाचा आकार लहान झाला याचा अर्थ राजनचा दबदबा कमी झाला.

Chhota Rajan : अजून वाचा 

त्यावेळी टाइम्स ऑफ इंडियाच्या एका बातमीचा मथाळा होता की राजनच्या गणपती शक्ती प्रदर्शनात घट या बातमीत म्हटलं होतं की टिळक नगरच्या गणेशोत्सवावर 30 लाख रुपये खर्च करण्यात येतो यावर मुंबई न्यायालयाचे न्यायाधीश ए पी बंगाळे यांनी स्वतःहून गणेशोत्सवासाठी पैसे कुठून येतात याचा शोध घेण्याचे आदेश दिले होते मात्र त्यात छोटा राजनाने आणि सह्याद्री क्रीडा मंडळ यात काहीही नातं आढळून आलेलं नव्हतं.so

पुढे दाऊद विरुद्ध राजन संघर्ष सुरू झाल्यावर चेंबूरचे बांधकाम व्यवसायिक ओमप्रकाश कुकरेजा यांची हत्या झाली. कुकरेजा छोट्या राजांच्या गणेशोत्सवाला 50 लाख रुपये वर्गणी द्यायचे अशी तेव्हा चर्चा होती. छोट्या शकीलनं कुकरेजा यांना मारलं तेव्हा राजांची आर्थिक रसद तुटेल आणि त्याचा राजांच्या गणेशोत्सवावर परिणाम होईल असा अंदाज होता.

पण तो साफ चुकीचा ठरला त्यावर्षीचा गणेशोत्सव नेहमीच्याच उत्साहात झाला.. राजांच्या मंडपाचा आकार कमी करून त्याला इशारा देणं जमलं हे वायसी पवार आणि जी आर खैरनार या जिगरबाज अधिकाऱ्यांनाच.so

स्टोरी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या